TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 जुलै 2021 – पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी नवी दिल्लीमध्ये सर्व विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणेल, संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दाबला जात आहे.

आज देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र उभे आहेत. कारण, आमचा आवाज संसदेमध्ये दाबला जात आहे. आमचा एकच प्रश्न आहे की, भारत सरकारने पेगॅसेस खरेदी केले का?. विरोधक आणि आपल्या लोकांच्याविरोधामध्ये याचा वापर झाला का?’ असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केला आहे.

पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्यावर सरकार संसदेत चर्चा करीत नाहीत. पेगॅसस स्पायवेअर देशाच्या विरोधात वापरले आहे. देशाच्या लोकशाहीच्या विरोधात या सॉफ्टवेअरचा वापर केला आहे.

पेगॅसस स्पायवेअर आमच्यासाठी राष्ट्रीय विषय आहे. हा केवळ गोपनियतेचा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रविरोधी कृत्य केलं आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नुकतीच पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते.